विहिरीत पाय घसरून पडल्याने आजोबा-नातीचा मृत्यू #chandrapur #death

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- आजोबा आणि नातीचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं गाव हळहळला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील टाटाकवडा शिवारात पाणी काढताना पाय घसरून आजोबा आणि नातीचा मृत्यू झाला आहे. शंकर गेडाम (५०) आणि पूर्वी गेडाम (१४) अशी मृतकांची नावं आहेत.

शेतात काम करत असताना पाणी काढण्यासाठी शंकर गेडाम विहिरीत उतरले मात्र त्यांचा पाय घसरला. आजोबा विहिरीत पडले. त्यांचा आवाज ऐकून नात त्यांना वाचवण्यासाठी आली. वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता ती देखील पाय घसरून विहिरीत पडली आणि दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेडाम कुटुंब शेतात पेरणीसाठी गेलं होतं. जवळ असलेलं पाणी संपलं, दुपारी तहान लागल्याने पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेले असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आजोबांचा पाय घसरला आणि विहिरीत पडले तर नात त्यांना वाचवायला गेली आणि तीही विहिरीत पडून मृत्युमुखी झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)